Thursday 20 December 2012

माणसाची परत अश्मयुगाकडे वाटचाल ...

        बिहारमधील खगडिया जिल्ह्यात मुख्याध्यापकाने पाचवीतील विद्यार्थिनीवर बलात्कार केला, नवी दिल्लीतील स्कूल बस चालक भावाने सोळा वर्षाच्या चुलत बहिणीवर अत्याचार केला,महाराष्ट्रात दोन प्राध्यापकांनी सहकारी महिला प्रध्यापिकांची छेड  काढली. या घटनांमधून तुम्हाला सुशिक्षित भारताचे दर्शन होते का?
        दिल्लीतल सामुहिक बलात्कार प्रकरण अजूनही ताजच आहे. झाल्या प्रकरणाची सविस्तर माहिती तशी आपल्या सगळ्यांनाच आहे आणि अस का घडल किंवा अस का घडत? हा प्रश्नसुद्धा आपल्या सगळ्यांनाच पडलाय. पण या प्रश्नच उत्तर मात्र कोणाकडेच नाही...
         पिडीत मुलीला न्याय मिळावा म्हणून संसदेतल्या सगळ्या स्त्रियांनी आपल्या मतावर ठाम राहून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हि मागणी केली.हि एक चांगली गोष्ट आहे आणि या घटनेमुळे सगळा देश जागा होऊन या पिडीत मुलीच्या मागे उभा आहे हि सुद्धा.
         पण हे अस का घडल? हा प्रश्न उरतोच.अस घडल कारण अशा घटना  घडल्यावरच भारतातले लोक जागे होतात!
          आपल्याला लहान पणापासून सांगण्यात येत कि बाईची अब्रू म्हणजे काचेच भांड असते. ते काचेच भांड फुटु नये. याची काळजी फक्त स्त्रीनेच घ्यायची ? समाजाची यात काहीच जबाबदारी नाही? कायद्याची काहीच जबाबदारी नाही?
          जर समाज सतर्क असेल, कायद्यात अशा आरोपींना/गुन्हेगारांना कठोर शिक्षा असेल तर का होईल अस? आता हे प्रकरण अजून मिटलेल नाही तर इकडे  दुसरी प्रकरण पुन्हा सुरूच आहेत! पटनात एका तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या  मुलीचा बलात्कार करून तिचा खून केला तर कोल्हापूरमध्ये प्रेमाला नकार दिला म्हणून मुलीच्या अंगावर तेजाब टाकण्यात आले...माणूस इतका राक्षसी कसा वागू शकतो? जनावर सुद्धा लाजतील अशी कृत्य करण्याचे विचार माणसाच्या मनात कसे येतात? अस कृत्य करताना एकाच्या सुद्धा मनात कस येत नाही कि हे चुकीच आहे? एकाचीही सद्सद विवेक बुद्धी जागरूक नसावी काय? माणसाची परत अश्मयुगाकडे वाटचाल सुरु झाली आहे काय? मग यांना शिक्षाही अघोरीच का नको?शिवाजी महाराजांचा राज्य कारभार आपण आदर्श मानतो,त्यांनीही महिलेवर अत्याचार करणाऱ्या पाटलाचे हात पाय छाटून टाकले होते,हे विसरायला नको.बालात्कार्यांना फाशी हीच योग्य आणि त्वरित शिक्षा व्हायला हवी!
            अशा घटना भारतातच जास्त घडतात. याला कारण कायदा ( आणि समाजसुद्धा) आणि त्यातल्या किती घटना आपल्या पर्यंत पोहोचतात? रोजच्या वर्तमानपत्रात तर रोज किमान ४-५ तरी बलात्काराच्या बातम्या असतातच! यामध्ये दोन वर्ष वयाच्या बालिके पासून ६० वर्षाच्या आज्जीपर्यंत पिडीत महिला असतात.बालात्कार्यांना वयाचाही विधिनिषेध नसावा का? शरमेने आपली मान खाली जाते.अरुणा शानबाग हेही एक असेच ज्वलंत उदाहरण. दिल्लीच्या केस मधील मुलीची अरुणा शानबाग होउदेउ नका. गुन्हेगारांना ताबडतोब व कठोर शासन झाले तरच पुढच्यांना कायद्याची भीती वाटेल.
            अस काही झाल कि नेते मंडळी जाऊन पीडितांना भेटून येतात.काही रक्कम "भरपाई" म्हणून देतात झाल! कोर्टात दाखल केलेला गुन्हा वर्षानु वर्ष चालूच राहतो...आणि पिडीत याचा मानसिक ताण आयुष्यभर सहन करतो.
            कुठे चाललोय आपण? विकसनशिलतेकडून विकसित देशाकडे कि  विकसनशिलतेकडून अविकसित देशाकडे? भारत २०२० मध्ये 'महासत्ताक' होण्याची स्वप्न पाहतोय ना आपण? असा असेल महासत्ताक भारत? जिथे स्त्री असुरक्षित आहे, भ्रष्टाचार बोकाळलाय, आणि कायदे धाब्यांवर बसवलेत! भरदिवसा खून होतात, कायदा हातात घेतला जातो, पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी इच्छा असूनही साक्षीदार पुढे येत नाहीत.
            असच जर सुरु राहणार असेल तर मग मला एक प्रश्न आपल्या सगळ्यांनाच विचारावासा वाटतो कि अशा या लोकशाहीपेक्षा इंग्रजांनी आपल्यावर केलेलं राज्य काय वाईट होत? हातातल्या काठीला सोन बांधून फिरलं तरी ते चोरी होण्याची भीती तरी तेंव्हा नव्हती .........
          








No comments:

Post a Comment