Sunday, 30 June 2013

'सामान्यातले असामान्य'

           काही दिवसांपूर्वी गावात प्रदर्शन भरल होत, आता अस प्रदर्शन भरल आहे म्हंटल्यावर माझ्यासाठी हि  पर्वणीच असते. ( आईच्या मागे लागून हवे तितके पुस्तक विकत घेता येतात.) या पुस्तकांमध्ये सुधा मुर्तींच एक नावाजलेल पुस्तक पण घेतल. ''सामान्यातले असामान्य''………         
         'सामान्यातले असामान्य' हा सुधा मूर्तींचा एक कथा-संग्रह. उमा कुलकर्णी यांनी या कथा-संग्रहाचा अनुवाद केला आहे. उत्तर कर्नाटकच्या संस्कृतीशी त्या पुरेपूर परिचित असल्यामुळे या कथासंग्रहातील अर्क मराठी वाचकांपर्यंत पोचवण त्यांना सहज शक्य झाल आहे.
            मला असलेली  वाचनाची गोडी बघून आणि मी करत असलेला पुस्तकांचा संग्रह बघून माझ्या आईने हे पुस्तक मला माझ्या संग्रहात भर म्हणून वाढदिवसाला भेट म्हणून दिल.
उत्तर कर्नाटकाची संस्कृती आणि वेगळा असा थाट , या प्रदेशाच स्वतःच अस असलेल वेगळ वैशिष्ट्य , त्या संधर्भातील काही व्यक्तींविषयी काही कथा या कथा-संग्रहात आहेत. या कथांबद्दल सुधा मूर्ती सांगतात की "आमच्या गावात माणसं आत एक आणि बाहेर एक असा विचारच करत नाही,वरवर ओबड-धोबड वाटल तरी आमच हे उत्तर कर्नाटक मृदुपणा आणि भावनाशिलतेमध्ये परिपूर्ण आहे ." आणि हे पुस्तक वाचल्यावर आपल्या लक्षात येत कि सुधा मुर्ती अगदी खरं सांगत आहेत.
             या पुस्तकामध्ये वर्णन केलेल्या व्यक्ती वरवर बघता अत्यंत सामान्य आहेत. तरीही त्यांच्यामध्ये असामान्य गुण आहेत.या सर्व व्यक्ती मध्यम-निम्नमाध्याम आर्थिक परिस्थितीतल्या असल्यामुळे उत्तर कर्नाटकातील सर्वसामान्य जीवनाचा प्रत्यय आपल्याला हे पुस्तक वाचल्यावर येतो.
             या पुस्तकाच्या पहिल्याच कथेत आपल्याला भेटतो 'बंडल बिंदाप्पा' दिसायला देखणा असा हा बिंदाप्पा तरुणपणी सिनेमात नट होता अस कोणी सांगितलं, तर नाही म्हणायचं करांच नाही!! सुधा मूर्तींच्या आजीने त्याच्या विषयी केलेली डेफिनेशन विचित्र आहे, ' बिंदाप्पा , एकाच चार करणारा माणूस! दोनशेच चारशे करणारा.' बंडल बिंदाप्पा हा प्रत्येक गोष्ट फुगवून सांगणारा , तोंडातून कधीही नकारात्मक बोलन न निघणारा. पण याच बिंदाप्पाला उत्तर कर्नाटकच्या इतिहासाविषयी खूप आदर आहे. असा हा बिंदाप्पा.
               पुढे ' असूया-तीच नाव अनसक्का ' हिची कथा आली आहे. अनसक्का म्हणजे गावातला ऑल इंडिया रेदिओ .या अनसक्काच्या तोंडातून कधीच कोणासाठी चांगले शब्द निघाले नाहीत. गावातल्या कुठल्या शुभ-अशुभ कार्यात तिच्या आवाजावरून तिचे अस्तित्व नजरेत येते.पण अशा या अनसक्काचा नवरा मात्र तिच्या एकदम विरुध्द आहे. शांत स्वभावाचा, मृदू , आणि अजिबात धैर्य नसलेला. मनात घर करणारी हि गोष्ट
              पुढची गोष्ट येते ती ' नलिनीची ' ' डब्बावाली नलिनीची' जीला कामाच्या व्यापामुळे घरी स्वयंपाक करायला वेळ नाही.त्यामुळे तिच्यासाठी गावातल्या कुठल्याही घरातून डब्बा यायचा. गावातल्या एखाद्या कार्यक्रमाला नलिनी जरी गेली नाही तरी तिचा डब्बा ती पाठवून द्यायची. पण तिच्या अशा वागण्याचा गावातल्या लोकांना कधी राग नाही आला.याच दाब्ब्यामुळे पुढे नलिनीचे लग्न कसे जमले,या गोष्टीचे वर्णन छान केले आहे.
              अशाच अनेक चांगल्या कथा या पुस्तकात आल्या आहेत. ' अपशकुनी सरसाक्का ', ' कंडक्टर भीमण्णा', ' विजोड', ' चतुर चामन्ना', 'स्वार्थी सावित्री', ' संधिसाधू सीमा', आणि बर्याच अजून कथा. या सर्वच कथा आपल्याला खिळवून ठेवणाऱ्या आहेत. प्रत्येक कथा वाचताना या सर्व व्यक्ती आपल्या समोर जिवंत उभ्या राहतात. सुधा मूर्तींना या सर्व व्यक्तीसोबत जे अनुभव आले ते वाचताना मन भरून जाते.

''मालगुडीचा नरभक्षक .........''

        काही दिवसांपूर्वीच ' आर.के.नारायण.' यांच्या चार पुस्तकांच्या संचाबद्दल वृत्तपत्रात जाहिरात वाचली आणि आपल्या संग्रही आर.के.नारायण यांची पुस्तक हवीत म्हणून मग हा संच मागविला. '' द बॅचलर ऑफ आर्टस्'', '' द इंग्लिश टीचर'', '' मालगुडीचा नरभक्षक'', आणि '' महात्म्याच्या प्रतीक्षेत'' अशी हि चार पुस्तक.
          आर.के.नारायण यांची मालगुडी डेज हि सिरिअल आणि पुस्तक तसे आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे आहे. '' स्वामी अंड फ्रेंड्स '' या पुस्तक पासून त्यांनी आपल्या लेखनाची सुरुवात केली. आर.के. नारायण यांच्या पुस्तकाची वैशिष्ट्ये म्हणजे हि सगळीच पुस्तक अगदी साधी सरळ, मालगुडी या काल्पनिक गावातील सर्वसामान्य माणसाचे आयुष्य सहज, ओघवत्या शैलीतून आणि मार्मिक विनोदातून वाचकांपुढे मांडणारी आहेत.
         या चार पुस्तकांमधल असच एक पुस्तक म्हणजे '' मालगुडीचा नरभक्षक'' . या पुस्तकाचा मराठी अनुवाद सरोज देशपांडे यांनी केलाय.
हि गोष्ट आहे मालगुडीच्या एका नटराज नावाच्या व्यक्तीची ज्याचा प्रिंटींगचा व्यवसाय आहे. पत्नी आणि मुलासोबत राहत असलेल्या आणि सगळ्यांशी मित्रत्वाने वागणाऱ्या या मुल पत्राच्या आयुष्यात जेव्हा वासू नावाचा एक इसम येतो तेव्हा नाटराजचे आयुष्य कसे बदलते याची हि गोष्ट आहे.
         नटराज हा एकदम साधा सरळ आणि हळव्या स्वभावाचा. मुंगीही आपल्या हातून मारता कामा नये अशा कुटुंबात लहानाचा मोठा झालेला.
पुढे त्याला त्याच्या व्यवसायामुळे दोन मित्र भेटतात. जे पेशाने कवी व पत्रकार आहे. नंतर त्याच्या व्यवसायाच्या निमित्यानेच वासू नावाचा एक ट्याक्सीडर्मिस्ट येतो. जो पूर्वी पेशाने पहिलवान होता ( एका मुठीत लोखंडाचे दर पडणारा ! ). शिकारीची भयंकर आवड असणारा आणि प्राण्या-पक्ष्यांना मारून त्यांच्यात पेंढा भरून तो विकून भरपूर पैसे कमावणाऱ्या या वासूचा स्वभाव तापट, रागीट, हेकेखोर, आणि हुकुम्शहसर्खे हुकुम सोडण्याचा आहे.
          पुढे हा वासू नटराजच्या प्रिंटींगप्रेसच्या पोटमाळ्यावर येउन राहायला लागतो ( नटराजने परवानगी दिलीच आहे असे गृहीत धरून!). पुढे वासू नटराजला बळजबरीने मेम्पिच्या जंगलात घेऊन जातो, तेंव्हा तिथे अनोळखी जागी नटराजला एकट्याला सोडून वासू कसा निघून जातो व नटराज परत घरी कसा येतो. हा प्रसंग लेखकाने छान मांडला आहे. नंतर पुढे हळू हळू वासू नटराजचा सर्व पोटमाळा प्राणी-पक्ष्यांच्या पेंढा भरलेल्या अवयवांनी भरून टाकतो. वासूच्या अशा स्वभावामुळे नटराज आणि वासुमध्ये वादावादी होऊन आलेलं वैर आणि अबोल अशी गोष्ट पुढे सरकते. पुढे नटराजच्या कवी मित्राने लिहिलेल्या एकपदी राधा आणि कृष्णाच्या कवितेचे पुस्तक पूर्ण झाल्यावर ते प्रकाशित करण्याच्या समारंभांच्या मोठ्या सोहळ्याची तयारी चालू होते आणि तयारीच्या वेळी नटराजला समजते कि वासू समारंभात आणल्या जाणाऱ्या हत्तीला गोळी घालून मारणार आहे.आणि त्याला विकून पैसे कमावणार आहे.
          नटराज वसुल त्याने हत्तीला मारु नये यासाठी खूप विनंती करतो.पण वासूचे मन वळवण्यात तो अयशस्वी ठरतो.पुढे तो हत्तीला कसे वाचवतो आणि त्यावेळी वासू स्वत:च स्वत:च्या पहिल्वणी शक्तीमुळे कसा मारतो.....अशी हि गोष्ट. साधीच पण वाचताना आपल्याला खिळवून ठेऊन, पुढे काय होईल? याबद्दल आपल्या मनात कुतूहल निर्माण करणारी.
           साधीच असली तरी आर.के.नारायण यांची हि पुस्तके आपल्या संग्रहात असली पाहिजे अशीच आहेत. तुम्हालाही हे पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल यात शंकाच नाही.

Tuesday, 25 June 2013

''Friends..........''

                Hello Friends, कसे आहात सगळे? पाऊस काय म्हणतोय तुमच्या कडे ? आज इतक्या दिवसांनंतर काहीतरी लिहायचा मूड आला. म्हणून म्हंटल तुमची चौकशी करू थोडी !  
               काय मस्त वाटतंय आज! बाहेर मस्त पाऊस सुरुय, हवेत गारवा आहे. मस्त गाणे सुरु आहेत आणि सोबत तुमच्याशी गप्पा! वा !आज तो दिन बन गया …. । आज कस happy happy वाटतंय . कारण पण तसच आहे. आणि बहुतेक तुमचपण तसच होत असाव. अरे हो , कारण सांगितलच नाही मी तुम्हाला …… 
               काय झाल कि आज तब्बल एक वर्षानंतर मी माझ्या एका खास मैत्रिणीशी बोलले. आज तिचा वाढदिवस असतो. तस पाहायला गेल तर आम्ही एकाच गावात राहतो. पण बारावीच्या परीक्षेनंतर जश्या सगळ्यांच्या वाट वेगळ्या होतात तश्या आमच्या पण झाल्या. सगळे आपापल्या अभ्यासात busy झाले. त्यामुळे फक्त वाढदिवस असल्यावर एकमेकांना भेटतो किंवा फोन करतो. तर या सुट्ट्यांना वैतागलेली असतानाच आज माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आला. तुम्हाला सांगते इतक छान वाटल तिच्याशी बोलून . मस्त पुन्हा कॉलेजच्या दिवसांत गेल्यासारखं वाटल! 
             काय मज्जा असतेना मित्र-मैत्रिणींसोबतच्या त्या दिवसांची ! आणि कॉलेज मध्ये तर ग्रुपच असतात वेगवेगळे. मस्त कॉलेज बंक करून कालेज कॅम्पस मध्ये फिरायचं, फ्रेंड्ससोबत वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारायच्या, वेळ पडल्यास आपली बाजू मांडण्यासाठी भांडायचं त्यांच्याशी. याच्या त्याच्या टवाळक्या करायच्या.  काही म्हणा पण अशा फालतू गोष्टी आपण फक्त आपल्या मित्र-मैत्रीनिनसोबतच करू शकतो . बरोबर न ? 
               खर पाहिलं तर आता फेसबुक मुळे आपण सगळेच जवळ आलोय. हव तेव्हा गप्पा मारता येतात फेसबुकवर. पण तरी आपल्या फ्रेंड्स सोबत घालवलेल्या दिवसांची मज्जा काही औरच असते. माझ तर जाऊद्यात, मी तर एक वर्षच भेटले नाही माझ्या फ्रेंड्सला,पण असे किती मित्र - मैत्रिणी असतात ज्यांचा कामामुळे किंवा दुसऱ्या गावी राहायला गेल्याने एकमेकांशी संपर्क तुटतो. अशा वेळी फक्त आठवणीच राहतात त्यांच्या जवळ कॉलेजच्या , आपल्या मित्र-मैत्रिणींच्या.……पण आता या अशा फ्रेंड्सला आपण फेसबुकवर भेटतो. आणि अशे आपले जुने फ्रेंड आपल्याला अचानक फेसबुकवर भेटल्याने काय छान वाटत ना ? अगदी बऱ्याचदा तर डोळे भरून येतात. 
           आज माझ्या सगळ्या जुन्या मित्र-मैत्रिणींची खूप आठवण येतेय. तुम्हाला येते का तुमच्या फ्रेंड्सची आठवण? माझ्या सारखा  वेडा आनंद होतो का त्यांना भेटल्यावर ?






Sunday, 2 June 2013

''एक कधी न उलगडलेलं नातं ………. ''

             सासू-सून हे नातं कोडया सारखच असत. आता हे फक्त मला वाटत कि तुमच्या सगळ्याचं हेच मत आहे ते मला नाही माहिती. पण सासू- सून हे नातं असत बाकी मज्जेशीर! आपले पूर्वज सांगून गेलेत कि सासू-सून ह्या आई-मुली सारख्या असतात. पण माझ्या पाहण्यात तरी अजून अस घर नाही जिथे सासू-सुना आई आणि मुलीसारख्या राहत असतील ( टि. व्ही. सोडला तर!).
              प्रत्येक घरात सासू आणि सूनेच वेगळच रूप पहायला मिळत . आणि त्यांच्या तितक्याच तऱ्हासुद्धा !
काही  घरांत सासू आणि सून दोघी खाष्ट असतात तर काही घरांत सासू गरीब गाय आणि सून चंडीकेच दुसर रूप असते. काही घरांत याच्या उलट चित्र असत,सासू कजाग आणि सून मवाळ असते. आणि एकत्र कुटुंब असेल तर मग विचारूच नका! ( रोज घरात रामायण - महाभारत युद्ध !) आता यात गंमत अशी कि या सासू - सुनांच्या भांडणात नवऱ्यांच बिचाऱ्यांच भरीत होत. ( हिची बाजू घेऊ कि तिची!)
                तस काही म्हणा पण या सासू-सुनांना भांडायला कुठलही कारण पुरत बर का ! म्हणजे अगदी भाजीत मीठ कमी घातल इथपासून ते तिने केलेली खरेदी वा अजून कुठलही कारण असो यांची भांडण ठरलेलीच असतात. यांची भांडणाची कारण ऐकून आपल्याला हसू येईल ( नवऱ्यांना) पण या सासू-सुनांसाठी हीच कारण खूप महत्वाची असतात!
             नवऱ्याने हौशीने बायकोला साडी आणली तर आईचा ( सासूचा ) टोमणा ठरलेला असतो. आमचा मुलगा आता आमचा राहिला नाही किंवा मग बायको आली तर आईला विसरला ! सासुच हे वाक्य संपत नाही तर बायको इकडे नवर्याच्या कानात कुजबुजते '' जरा काही हौशीने आणल तर तुमच्या आईला पाहवत नाही!"
तसच बाहेर फिरायला गेल्यावर सुद्धा  बऱ्याच सासवांना वाटत कि मुलाने बाहेर जाताना एकदापण आपल्याला नाही विचारल. ….
            बऱ्याचदा काय होत कि सासू हि दोन्ही घरी ( माहेरी आणि सासरी ) एकत्र  कुटुंबात राहिलेली असते त्यामुळे सर्वाना सांभाळून राहाण आणि मोठ्या प्रमाणात काम करण्याची सवय तिला असते. तिचा हाच स्वभाव तिच्या सुनेकडे असावा अशी तिची इच्छा असते. पण ते शक्य नसत. आजच्या या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात मुलींना एकत्र कुटुंबात राहायची इच्छा  नसते.  त्यामुळे त्यांना अशा मोठ्या घरात राहाण कठीण जात. आणि मग सासू-सुनांचे खटके उडायला सुरुवात होते.
             असे खटके उडायला लागले म्हणजे सासू - सुना एकमेकींना समजून घ्यायचा प्रयत्न का करत नाही हा प्रश्न मला नेहेमी पडतो. कुठल्याही नात्यात Understanding महत्वाची असते अस आपणच म्हणतो ना , मग या सासू-सुनांच्या नात्यात ते Understanding का दिसून येत नाही कोणास ठाऊक.माझ्या पाहण्यातल्या सगळ्याच सासवा काही वाईट किंवा कजाग नाहीत. सुनांबद्दल पण मी हेच म्हणेन. मग आता तुम्ही म्हणाल कि दोघी जर वाईट नाहीत तर त्यांची भांडण का होतात? 
            मुलगी लग्न करून जेव्हा सासरी येते तेव्हा तिच्या मनात एकच भीती असते कि आपली सासू कशी असेल. खर म्हणजे होत काय कि लग्ना आधी मुलीमुलींमध्ये सासू या व्यक्तीवर बरीच चर्चा झालेली असते. त्यातच जर एखादी मुलगी आधीच लग्न झालेली असेल तर मग ती तिच्या सासूच्या चहाड्या करते. आणि नको ते ( फुकटचे )उपदेश दुसऱ्या मुलींना करते. आता प्रत्येक सासूचा स्वभाव काय सारखा नसतो कि एकीची सासू अशी वागली म्हणजे दुसरीची पण तशीच वागेल ! 
            हि अशी भूत मुलींच्या डोक्यात घातली म्हणजे लग्नानंतर जर त्या मुलीला सासूला आईचा दर्जा द्यायचा असेल तर ती तो देत नाही. आणि जरी तो दिला तरी नंतर खटके उडायचे ते उडतातच. समजा सासू सुनेशी छान वागतेय सगळ सुरळीत चाललय आणि एखाद दिवशी सासू काही कारणा  वरून सुनेला रागावली तर सून लगेच ती गोष्ट माहेरी सांगते. सासू माझ्याशी छान वागते हे नाही सांगणार पण सासूबाई मला रागावल्या हे आधी सांगेल. या अशा सुनांना मला विचारावस वाटत कि जर सासू ऐवजी तुमची आई तुम्हाला रागावली असती तर तुम्ही एवढा बोभाटा केला असता का? नाही ना ? मग सासू थोड बोललीच तर बिघडत कुठे? ( हे मुलींना त्यांच्या नवऱ्याने समजवायला हव.)
                 काही - काही सुना तर इतक्या पुढच्या असतात न कि त्यांच्या बद्दल बोलायला शब्दच नसतात आपल्या जवळ! एखाद्या सुनेला सासू समजा बोलली कि तू आज भाजीत मीठ जास्त घातलय तर या सुना (सगळ्याच नाही म्हणत मी ) दुसऱ्या दिवशीपासून स्वयंपाक करणच सोडून देतात ! आणि कारण विचारलच तर म्हणतात सासूबाईना माझ्या हातचा स्वयंपाक पटत नाही !  असच घरातल्या इतर कामांच्या बाबतीत सुद्धा होत. मग होत काय कि घरात सून असून पण सासूलाच सगळी कामे करावी लागतात. हे तर एकच उदाहरण झाल एखादी सून जर नोकरी करत असेल आणि सासू जर चांगली असेल तर सुनेला हातभार म्हणून घरातली सगळी काम करून घेत असेल तर या सुनांना बरच होत. उलट सासूने एखाद दिवस काम नाही केल तर त्या चिडचिड करतात.
            एखादी सासू धार्मिक असली तर तिला वाटत कि आपल्या सुनेने सुद्धा उपवास, व्रत वैकल्य करावे. आणि अशा वेळी सून जर आडूनच बसली कि 'मी नाही करणार हे उपवास वगैरे , माझा त्यावर विश्वास नाही' तर भांडण हमखास होतात. माला मान्य आहे कि आजकालच्या मुलींचा अशा धार्मिक गोष्टींवर विश्वास नसतो (माझा सुद्धा नाही!). पण आपल्या उपवास करण्याने किंवा व्रत-वैकल्य केल्याने सासूला चांगल वाटणार असेल तर ते का करू नयेत. अशा वेळी आपण या गोष्टी मानतो कि नाही हे महत्वाच नसतच मुळी, आपण या गोष्टी केल्याने कोणाला तरी समाधान होईल हेच लक्षात ठेवायचं फक्त.दोघींच्या वागण्यात लवचिकता हवी.म्हणजे काय तर बदलांचा स्वीकार. सासूने जून सोडून द्याव सुनेने नवीन शिकव, इतकाच ! थोड तुझ खर थोड माझ खर. (बाजारात भाव टाव करताना नाही का आपण म्हणत "तुझाही जाऊदे आणि माझाही जाऊदे" अस म्हणून मध्यम मार्ग काढतो )समजूतदारपणात दोघींनी एक एक पाउल पुढे याव आणि अहंकारात एक एक पाउल मागे जाव.
                मला अस वाटत कि जश्या सुनांच्या सासू कडून, नवऱ्याकडून काही अपेक्षा असतात तशा सासूच्या आपल्या सुनेकडून नसतील का? त्यांना पण तर मोकळीक हवीच असेल ना. त्यांना पण तर वाटतच असेल न कि संसाराच्या या रामरगाड्यातून निवृत्त व्हाव. मग सुनांनी त्यांना ती मोकळीक दिली तर काय होईल?माझ्या मते घरात मोठी माणस असली म्हणजे उलट घरातल्या लहान मुलांवर चांगले संस्कार होतात आणि सुनांना पण सासूची मदत मिळते.आणि कुटुंब बांधून राहते.
                बापरे!! एखादी सून जर हे वाचत असेल तर माझ्या नावाने खडे फोडत असेल नक्कीच कि काय मी सगळ्या सुनांबद्दल वाईट लिहितेय म्हणून ! पण अजून बरच लिहायचय मला ………पण आता जरा सासवांबद्दल बोलूयात. ……( हुश्श ! संपले एकदाचे सुनांचे गाऱ्हाणे करून!)
               घरातली सून जितकी चुकते तितकीच सासू पण चुकते बर का ! काही सासवा अशा सुद्धा असतात ज्यांना सून आली तरी घरातला आपला अधिकार सोडावासा वाटत नाही . सगळ आपल्याच पद्धतीने झाल पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असतो. या साठी त्यांना सुनेचा छळ करावा लागला तरी यात त्यांना काही गैर वाटत नाही!
             अहो, काही काही सासवा तर हद्दच करतात. भाजी माहेरच्या पद्धतीने केली म्हणून सुद्धा सुनेचे गाऱ्हाणे करतात. उलट अशावेळी सुनेला समजवायचं , तिला  शिकवायचं कि ' बाई आपल्या कडे अशी भाजी करत नाही, मी शिकवते तुला ' ते राहत बाजूला, जेवायच्या वेळी मग कटकट करत बसतात. ती वेगळ्या वातावरणात वाढलेली असते. त्यामुळे आपणच थोड Adjust केल तर काय बिघडेल! 
              एवढे वर्ष मुलगा आपल्याला साडी आणतच होताना , मग आणली एखादी साडी बायकोसाठी तर साडीच कौतुक करायचं सोडून उगीच टोमणे काय मारायचे! आणि मुलाला त्याच आयुष्य बायकोसोबतच घालवायच असत त्यामुळे माझा मुलगा आता माझा राहिला नाही अस म्हणून सुद्धा काही उपयोग नसतो. उलट सून घरात आल्यावर स्वखुशीने घराचा ताबा तिच्या कडे देऊन मोकळ व्हायचं. '' मला दोन वेळेच जेवण घाल म्हणजे झाल " अस जर सासू म्हणाली तर सुनेलासुद्धा हुरूप येईल घरात काम करायचा. (administration चा सुद्धा नियम आहे एखाद्याकडे पूर्ण जबाबदारी सोपवली कि तो ती आत्मविश्वासाने पुरी करतो , कारण त्याला जाण असते कि आपल्या कृतीच्या चांगल्या वाईट परिणामांना तोच पूर्णतः जबाबदार राहील)तिला सुद्धा वाटेल कि हे घर आपल आहे. आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे सासू बद्दल आदर वाटेल सुनेला! 
               मित्र-मैत्रिणींनो तुम्हाला वाटेल कि मी खूपच Over लिहिलंय सासू-सुनांबद्दल, पण ह्या गोष्टी मी स्वत: लोकांच्या घरात घडताना पाहते. त्यामुळे त्यांच्या चुका लक्षात येतात. तुमच्या घरात जर अस घडत असेल तर तुमच्याही लक्षात या चुका याव्यात म्हणून मी हे सर्व लिहील. आणि अजून तुम्हाला हा अनुभव नसेल तर तो आल्यावर या चुका तुम्ही टाळू शकाल!(माझही घोडा मैदान अजून खूप दूर आहे!)