Sunday 30 June 2013

''मालगुडीचा नरभक्षक .........''

        काही दिवसांपूर्वीच ' आर.के.नारायण.' यांच्या चार पुस्तकांच्या संचाबद्दल वृत्तपत्रात जाहिरात वाचली आणि आपल्या संग्रही आर.के.नारायण यांची पुस्तक हवीत म्हणून मग हा संच मागविला. '' द बॅचलर ऑफ आर्टस्'', '' द इंग्लिश टीचर'', '' मालगुडीचा नरभक्षक'', आणि '' महात्म्याच्या प्रतीक्षेत'' अशी हि चार पुस्तक.
          आर.के.नारायण यांची मालगुडी डेज हि सिरिअल आणि पुस्तक तसे आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे आहे. '' स्वामी अंड फ्रेंड्स '' या पुस्तक पासून त्यांनी आपल्या लेखनाची सुरुवात केली. आर.के. नारायण यांच्या पुस्तकाची वैशिष्ट्ये म्हणजे हि सगळीच पुस्तक अगदी साधी सरळ, मालगुडी या काल्पनिक गावातील सर्वसामान्य माणसाचे आयुष्य सहज, ओघवत्या शैलीतून आणि मार्मिक विनोदातून वाचकांपुढे मांडणारी आहेत.
         या चार पुस्तकांमधल असच एक पुस्तक म्हणजे '' मालगुडीचा नरभक्षक'' . या पुस्तकाचा मराठी अनुवाद सरोज देशपांडे यांनी केलाय.
हि गोष्ट आहे मालगुडीच्या एका नटराज नावाच्या व्यक्तीची ज्याचा प्रिंटींगचा व्यवसाय आहे. पत्नी आणि मुलासोबत राहत असलेल्या आणि सगळ्यांशी मित्रत्वाने वागणाऱ्या या मुल पत्राच्या आयुष्यात जेव्हा वासू नावाचा एक इसम येतो तेव्हा नाटराजचे आयुष्य कसे बदलते याची हि गोष्ट आहे.
         नटराज हा एकदम साधा सरळ आणि हळव्या स्वभावाचा. मुंगीही आपल्या हातून मारता कामा नये अशा कुटुंबात लहानाचा मोठा झालेला.
पुढे त्याला त्याच्या व्यवसायामुळे दोन मित्र भेटतात. जे पेशाने कवी व पत्रकार आहे. नंतर त्याच्या व्यवसायाच्या निमित्यानेच वासू नावाचा एक ट्याक्सीडर्मिस्ट येतो. जो पूर्वी पेशाने पहिलवान होता ( एका मुठीत लोखंडाचे दर पडणारा ! ). शिकारीची भयंकर आवड असणारा आणि प्राण्या-पक्ष्यांना मारून त्यांच्यात पेंढा भरून तो विकून भरपूर पैसे कमावणाऱ्या या वासूचा स्वभाव तापट, रागीट, हेकेखोर, आणि हुकुम्शहसर्खे हुकुम सोडण्याचा आहे.
          पुढे हा वासू नटराजच्या प्रिंटींगप्रेसच्या पोटमाळ्यावर येउन राहायला लागतो ( नटराजने परवानगी दिलीच आहे असे गृहीत धरून!). पुढे वासू नटराजला बळजबरीने मेम्पिच्या जंगलात घेऊन जातो, तेंव्हा तिथे अनोळखी जागी नटराजला एकट्याला सोडून वासू कसा निघून जातो व नटराज परत घरी कसा येतो. हा प्रसंग लेखकाने छान मांडला आहे. नंतर पुढे हळू हळू वासू नटराजचा सर्व पोटमाळा प्राणी-पक्ष्यांच्या पेंढा भरलेल्या अवयवांनी भरून टाकतो. वासूच्या अशा स्वभावामुळे नटराज आणि वासुमध्ये वादावादी होऊन आलेलं वैर आणि अबोल अशी गोष्ट पुढे सरकते. पुढे नटराजच्या कवी मित्राने लिहिलेल्या एकपदी राधा आणि कृष्णाच्या कवितेचे पुस्तक पूर्ण झाल्यावर ते प्रकाशित करण्याच्या समारंभांच्या मोठ्या सोहळ्याची तयारी चालू होते आणि तयारीच्या वेळी नटराजला समजते कि वासू समारंभात आणल्या जाणाऱ्या हत्तीला गोळी घालून मारणार आहे.आणि त्याला विकून पैसे कमावणार आहे.
          नटराज वसुल त्याने हत्तीला मारु नये यासाठी खूप विनंती करतो.पण वासूचे मन वळवण्यात तो अयशस्वी ठरतो.पुढे तो हत्तीला कसे वाचवतो आणि त्यावेळी वासू स्वत:च स्वत:च्या पहिल्वणी शक्तीमुळे कसा मारतो.....अशी हि गोष्ट. साधीच पण वाचताना आपल्याला खिळवून ठेऊन, पुढे काय होईल? याबद्दल आपल्या मनात कुतूहल निर्माण करणारी.
           साधीच असली तरी आर.के.नारायण यांची हि पुस्तके आपल्या संग्रहात असली पाहिजे अशीच आहेत. तुम्हालाही हे पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल यात शंकाच नाही.

No comments:

Post a Comment