Saturday 17 November 2012

मी शिवाजी पार्क बोलतोय !

                   आज सगळ्यांच्या मुलाखती होतायत, सगळ्यांनी मन मोकळ केलय, पण मला कोणी विचारेल का?मला काय वाटतंय ते.आज माझ्या या शिव तीर्थावरचा देव हरपला. अनंतात विलीन झाला.
                    मला, या शिवाजी पार्कला ज्याने तीर्थाचे स्वरूप आणल त्या हिंदुहृदय सम्राटाला माझे शतशः नमन!जेव्हा जेव्हा हा ढान्या वाघ गुहेतून निघाला तेव्हा तेव्हा त्याने माझ्या साक्षीनेच गर्जना केली, डरकाळी फोडली.माझा परिसर दणाणून सोडला. त्याला ऐकायला येणार्यांनी इतकी गर्दी केली कि मुंगीलाही शिरकाव नसावा.
                      शिवसेनेच्या जन्मानंतर मला या वाघाची प्रथम ओळख झाली आणि लोकांनी माझ्या साक्षीने त्याची पहिली गर्जना ऐकली. तो दिवस होता ३० ऑक्ट. १९६६. बाळासाहेबांची पहिली जाहिर सभा या माझ्या परीसारात झाली.पाच लाखाचा जनसमुदाय त्यांना ऐकायला जमला होता.तेव्हा तो समुदाय कोणत्या एका पक्षाचा नव्हता, ते होते हिंदुत्वावर प्रेम करणारे लोक.तेव्हापासून आजतागायत शिवसेनेचा दशहरा मेळावा, बाळासाहेबांची गर्जना आणि शिवाजी पार्क एक झाले.माझ्या परिसराला तीर्थाचे रूप आले.
                    अशी एकच गर्जना मी आचार्य अत्र्यांची ऐकली होती!
                    बाळासाहेबांच्या माझ्या परिसरातल्या सभा लोक कधीच विसरू शकणार नाहीत.त्यांनी मलाही इतिहासात अजरामर करून ठेवलं.
                    उद्या बाळासाहेब माझ्या कुशीत विश्रांती घेतील,केव्हढा हा दैवदुर्विलास.ज्या वाघच राज्य माझ्या साक्षीने सुरु झाल त्याचा शेवटही माझ्या साक्षीने व्हावा? माझ मन आक्रांदतय.
                   आता हा शिवाजी पार्क त्या महान हिंदू हृदय सम्राटाची गर्जना कधीच ऐकू शकणार नाही.या शिवातीर्थाचा देव हरपलाय. उद्या लाखो लोक जमतील त्याला निरोप द्यायला , पण मलाही विचाराहो कोणी, मला काय वाटतय.
                   पुढेही दशहरा मेळावे होतील, सभा होतील , पण या वाघाची डरकाळी मुंबई दणाणून सोडायला नसेल.
                      

No comments:

Post a Comment