Monday 19 November 2012

" छडी लागे छम छम, विद्या येई घम घम.."

        'विद्यार्थ्यांना मारणाऱ्या शिक्षकांना जेल होणार' हि गोष्ट सरकारने जाहीर केल्यापासून याबद्दल बरेच तर्क वितर्क लढवले जातायत. बराच बर वाईट बोलं जातंय.खरतर या सगळ्यामुळे मुलांना शिक्षकांची भीती वाटायपेक्षा शिक्षकांनाच मुलांची भीती वाटायला लागलीय.
          सर्वांसमोर शिक्षकांनी मुलांना मारले किंवा रागावले तर त्या विद्यार्थ्याला अपमान वाटतो आणि त्याच्यावर मानसिक परिणाम होतो म्हणे! म्हणून हा कायदा.......या कायद्याबद्दल समजल्यावर सर्वच आई-बाबांना आपला शाळा- महाविद्यालयातील काळ आठवल्या वाचून राहिला नसेल ( अगदी आत्ताच महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा )
           अगदी काही वर्षांपूर्वी पर्यंत शिक्षकांची आदरयुक्त भीती विद्यार्थ्यांच्या मनात असायची.शिक्षकांनी जर शिक्षा केली तर त्याबद्दल विद्यार्थी घरी वाच्यतासुद्धा करायचे नाही.कारण त्यावेळी पालकांनासुद्धा शिक्षकांबद्दल विश्वाश आणि आदर होता.पालकांना जरी समजल कि शिक्षकांनी आपल्या पाल्याला शिक्षा केली तरी ते शिक्षकांना जाब विचारीत नव्हते. 'आपल्या पाल्याची चुकी असल्याशिवाय गुरुजी त्याला/तिला शिक्षा करणार नाही याची खात्री पालकांना होती.
            काळ बदलला .......... आता बऱ्याच  कुटुंबात एकच आपत्य असल्याने जरा कोड  कौतुकताच त्याला वाढवले जाते आणि अशातच जर शाळा-महाविद्यालयात जर शिक्षकांनी त्याला काही कारणास्तव शिक्षा केलीच तर पालक सर्व दोष शिक्षकांनाच देतात. यात आपल्या पाल्याची चुकी आहे कि नी याची चौकशीसुद्धा करत नाही.
            आणि त्यातच आणखीन भर म्हणून आता आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना नापास करायचे नाही..(?)असाही नियम काढलाय.यामुळे विद्यार्थ्यांना आता आणखीनच मोकळीक मिळालीय.
             काही प्रमाणात हे नियम योग्य आहेत कि विद्यार्थ्यांना मारायचे नाही.कारण बऱ्याचदा शिक्षक शिक्षेच्या नावाखाली आपली वैयक्तिक दुष्मनी काढतात.पण जर देशाला उद्याचा कर्तबगार नागरिक घडवायचा असेल तर आजच्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळणे गरजेचे आहे. अशातच जर विद्यार्थ्यांना काही सौम्य प्रकारच्या शिक्षा शिक्षकांनी केल्या तर त्यात काही वाईट नसेल.कारण एकुलते एक अपत्य म्हणून आणि आई- बाबा दोघेही नोकरी करत असल्याने त्यांच्या मनात अपराधी भावना असते मग "क्वालिटी टाइम" देण्याच्या नावाखाली त्याचे खूप कोड कौतुक करतात.शिस्त धाक यांचा अभाव आढळतो.याचा अर्थ काय..? घरीपण कोणी रागवायचे नाही आणि शाळेतही नाही.....मग मुलांना वळण कसे लागणार.एखादे चित्र जसे चौकटीत छान दिसते तसेच मुलांना शिस्त व धाकाची चौकात असायलाच हवी.
            सरकार जे नवीन नवीन कायदे करते ते मुलांना वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमांमुळे लगेच समजतात.त्यामुळे त्यांना शाळा आणि शिक्षकांची आदरयुक्त भीती वाटणार नाही.जुन्या पिढीला त्यांच्या शिक्षकांनी जसे घडवले त्यामुळे ती पिढी बिघडली का.?दिशाहीन झाली का ? नाही ना ..? मग आत्ताच शिक्षेचा बाऊ का..?
            माझी आज्जी तर म्हणते.." छडी लागे छम छम, विद्या येई घम घम.."        

No comments:

Post a Comment