नाशिकच्या चिखलीकरांच संपत्ती प्रकरण चांगलच गाजलंय सध्या . आता हे एवढ सगळ झालय म्हंटल्यावर मिडियावाले त्याच्या घरी गेले नाहीत म्हणजेच नवल.… चिखलीकरांच्या आई - वडिलांना काय प्रश्न विचारावा या मिडियावाल्यांनी? '' तुम्हाला आता कस वाटतंय ?''
आता हा प्रश्न हास्यास्पद आहे …..... आता तुम्ही सांगा काय वाटणार आहे त्या चिखलीकरांच्या आई - वडिलांना ( आनंदाने पेढे वाटतील का ते! ). हे मिडियावाले कुठे आणि कोणत्या क्षणी कोणाला '' तुम्हाला आता कस वाटतंय ?'' विचारतील काही सांगता नाही येत .
अहो, शेतकऱ्याने आत्महत्या केली तर हे त्याच्या बायकोला जाऊन विचारतात कि '' तुम्हाला आता कस वाटतंय?'' आता ज्या बाईच्या नवऱ्याने आत्महत्या केलीय तिला आनंद तर होणार नाही !
असे प्रश्न या मिडियावाल्यांनाच सुचतात बर का फक्त.. परीक्षेत यश मिळवलेल्यांना पण सगळ्यात आधी '' तुला आता कस वाटतंय ?'' हाच प्रश्न विचारतात आणि मग बाकीच्या चौकश्या करतात .
तुम्हाला आठवत असेल कि काही दिवसांपूर्वी मुंबईत इमारत कोसळून मोठी दुर्घटना झाली . तेव्हा हे मिडियावाले हॉस्पिटल मध्ये गेले आणि तिथे एका जखमीला ( ज्याचे हात - पाय आधीच मोडले होते!) हे जाऊन विचारताय कि ''तुम्हाला आता कस वाटतंय?''. तीच गत बॉम्बस्पोटाच्या वेळीही बघायला मिळते. आपले पोलिस जखमी अवस्थेतही लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घेत असतात आणि हे मधेच जाऊन त्यांना विचारतात '' तुम्हाला आता कस वाटतंय ?''
पत्रकारितेच शिक्षण घेतानाच असा प्रश्न विचारायचा हे शिकवतात कि काय कोण जाणे ! एखाद्या अभिनेत्याला पुरस्कार भेटला तरी '' तुम्हाला आता कस वाटतंय?" आणि पुरस्कार नाही भेटला तरी यांच आपल '' आता कस वाटतंय ?'' आता बिचाऱ्यांना वाईट वाटत असल तरी काय सांगतील. मग तोंड देखल काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात.( मग काय करतील म्हणा!) दुसऱ्याच्या मनाचा विचारच करत नाहीत हे त्यामुळे '' तुम्हाला आता कस वाटतंयची?'' यांची लामणच संपत नाही.
मला तर वाटत कि या मिडियावाल्यांनाच कोपच्यात घ्याव एक दिवस आणि मग त्यांनाच विचारावं "आता तुम्हाला कसं वाटतंय ?''
अहो, शेतकऱ्याने आत्महत्या केली तर हे त्याच्या बायकोला जाऊन विचारतात कि '' तुम्हाला आता कस वाटतंय?'' आता ज्या बाईच्या नवऱ्याने आत्महत्या केलीय तिला आनंद तर होणार नाही !
असे प्रश्न या मिडियावाल्यांनाच सुचतात बर का फक्त.. परीक्षेत यश मिळवलेल्यांना पण सगळ्यात आधी '' तुला आता कस वाटतंय ?'' हाच प्रश्न विचारतात आणि मग बाकीच्या चौकश्या करतात .
तुम्हाला आठवत असेल कि काही दिवसांपूर्वी मुंबईत इमारत कोसळून मोठी दुर्घटना झाली . तेव्हा हे मिडियावाले हॉस्पिटल मध्ये गेले आणि तिथे एका जखमीला ( ज्याचे हात - पाय आधीच मोडले होते!) हे जाऊन विचारताय कि ''तुम्हाला आता कस वाटतंय?''. तीच गत बॉम्बस्पोटाच्या वेळीही बघायला मिळते. आपले पोलिस जखमी अवस्थेतही लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घेत असतात आणि हे मधेच जाऊन त्यांना विचारतात '' तुम्हाला आता कस वाटतंय ?''
पत्रकारितेच शिक्षण घेतानाच असा प्रश्न विचारायचा हे शिकवतात कि काय कोण जाणे ! एखाद्या अभिनेत्याला पुरस्कार भेटला तरी '' तुम्हाला आता कस वाटतंय?" आणि पुरस्कार नाही भेटला तरी यांच आपल '' आता कस वाटतंय ?'' आता बिचाऱ्यांना वाईट वाटत असल तरी काय सांगतील. मग तोंड देखल काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात.( मग काय करतील म्हणा!) दुसऱ्याच्या मनाचा विचारच करत नाहीत हे त्यामुळे '' तुम्हाला आता कस वाटतंयची?'' यांची लामणच संपत नाही.
मला तर वाटत कि या मिडियावाल्यांनाच कोपच्यात घ्याव एक दिवस आणि मग त्यांनाच विचारावं "आता तुम्हाला कसं वाटतंय ?''
No comments:
Post a Comment