Saturday 25 May 2013

"Turning Point..."

                आपल आयुष्य बदलेल अस काही तरी आपल्या आयुष्यात नेहेमीच घडत असत. मग ते चांगल्या पद्धतीने बदलत ,नाहीतर वाईट पद्धतीने. पण यातली एखादीच गोष्ट आपल्या स्मरणात आयुष्यभर राहते. माझ्या मते असले Turning Point प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असावेत. कधी आणि कसा हा Turning Point आपल्या आयुष्यात येतो ते आपल्याला पण समजत नाही. 
               मी माझ्या आयुष्यातल्या Turning Point चा विचार करते तेव्हा मला माझा अकरावी - बारावीचा कॉलेजचा काळच आठवतो.दहावीच्या निकाला नंतर मी आमच्या गावातील वाणिज्य शाखेसाठी प्रसिद्ध असलेल्या कॉलेज मध्ये अकरावी(वाणिज्य)ला  प्रवेश घेतला त्यावेळा या नवीन कॉलेजबद्दल मनात थोडी भीतीच होती. कॉलेज कस असेल, शिक्षक कसे असतील, त्यांची शिकवण्याची पद्धत, तिथल्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला जुळवून घेता येईल कि नाही. वगैरे वगैरे . आता हि भीती या साठी वाटत होती मला कारण कि मी दहावी पर्यंत ज्या शाळेत होते,तिथे माझी तुकडी होती क आणि मी होते ढ !भाषा विषय आवडायचे पण गणित भूमिती खूपच अवघड वाटायचं.तिथल्या शिक्षकांची शिकवण्याची पद्धत अवघड होती. ( ते मला मुळीच समजायचं नाही) त्यांनी शिकवलेलं सार डोक्यावरून जायचं त्यामुळे मी कधी अभ्यासाच्या बाबतीत सिरिअस झाल्याच मला आठवत नाही.  त्यामुळे दहावी सहामाहीत मी गणितात नापास झाले. झाल.  मम्मीने मला धारेवर धरल. माझी अभ्यासाची पद्धत बदललि. मानेवर जू ठेऊन अभ्यास करवून घेतला आणि मी झाले प्रथम श्रेणीत दहावी पास. पुढे त्याच शाळेत अकरावीसाठी प्रवेश न घेता नवीन चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचं ठरलं.
                                         या नवीन कॉलेजविषयी मला भीती वाटण साहजिकच होत. कॉलेज सुरु झाल त्या पहिल्या दिवशीच शिक्षकांनी शिकवायला सुरुवात केली होती. माझ्या  सवयी प्रमाणे मी कॉलेजची पुस्तक  सुट्टीतच वाचून काढली होती. त्यामुळे शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर मला अगदी लगेच सांगता आली होती तेंव्हा. सुरुवात तिथूनच झाली आणि बहुतेक, कारण तेंव्हा दिलेल्या उत्तरांमुळे शिक्षकांच्या नजरेत माझ्यासाठी एक वेगळी जागा झाली होती. ( ती पुढे अजूनही टिकून आहे हे सांगायलाच नको )
              खर म्हणजे एन्झोकेम कॉलेजच अस आहे कि तिथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ते आपल दुसर घरच वाटत. तस हे कॉलेज फार मोठ नाही. पण मुलांसाठी वाचनालय, संगणक वर्ग वगैरे सारख्या सुविधा आहेत. आणि याही पेक्षा सगळ्यात महत्वाच म्हणजे तिथले शिक्षक. मला आठवत नाही कि आमचे शिक्षक आम्हाला कधी रागावले असतील. त्यांनी आम्हाला नेहेमीच त्यांच्या मुलांसारखच वागवल. इथल्या शिक्षकांचं एक वैशिष्ट्य अस कि ते नेहेमीच विद्यार्थ्यांकडून शिकत गेले. आणि यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मिसळण सोपं  झालय त्यांच्यासाठी. आणि त्यांच्या या वागण्यामुळेच आम्हालाही ते नेहेमी आमच्यातलेच वाटत आले. या सर्व शिक्षकांबद्दल आमच्या मनात आदर होता पण भीती कधीच नव्हती. कॉलेजच्या ग्राउंडवर विद्यार्थी गप्पा मारत असले म्हणजे हे शिक्षक सुद्धा आमच्यात सामील व्हायचे. 
                  आयुष्याबद्दल, भविष्याबद्दल विचार करायलाही इथेच शिकले मी. मला चांगल आठवतय कि आमच्या Accountच्या सरांनी आम्हाला एक स्वप्न दाखवल होत. ते नेहेमी म्हणायचे कि ''तुम्ही आयुष्यात खूप मोठे व्हाल,मोठ्या पदावर जाल तेंव्हा तुम्हाला पुन्हा या कॉलेज मध्ये यायचय दुसऱ्या  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला. आम्ही आज ज्या स्टेजवर उभ राहून तुम्हाला शिकवतो, तिथे उभ राहून बोलायचय.''
ते अस बोलायचे तेंव्हा तर ते चित्र डोळ्यांसमोर उभ राहायचं आमच्या. माझ्या मते हि मी पाहिलेली पहिलीच शाळा असेल जिथे पुस्तकी ज्ञाना शिवाय इतर व्यावहारिक ज्ञान देण्यावरसुद्धा भर दिला जातो.
               या कॉलेजमध्ये येण्या आधी मी पुढे काय करायचं ह्या बद्दल माझ्या मनात विचार सुद्धा आला नव्हता. पण आता जर कोणी मला विचारल कि पुढे काय करायचय तर माझ्याकडे या प्रश्नच उत्तर आहे.
मला माझ्या करिअरची फिल्ड ठरवता आली ती आमच्या कॉलेजच्या Magzine मध्ये छापून आलेल्या माझ्या एका लेखामुळे. तो लेख छापून आला त्यावेळा ठरवून टाकल ( किंवा मग अस म्हणा कि मला तस ठरवता आल)आपल्याला  ह्याच फिल्ड मध्ये करिअर करायचं.( Journalism)
              खरतर या दोनच वर्षांत या कॉलेजमध्ये घडलेल्या कितीतरी गोष्टींनी माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टी कोण बदलला. या कॉलेज बद्दल जितक सांगाव तितक थोडच वाटतय. त्यामुळे थांबते आता. 
             तुमच्या आयुष्यात आलाय का असा Turning Point ज्याने तुमच आयुष्य बदलल?



                  

No comments:

Post a Comment